
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवी मूल्यांना जनतेत रुजवण्याची शिवशपथ,रायरेश्वर येथे सोहळा संपन्न
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या घटनेला 27 एप्रिल 2025 रोजी 380 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शिव शपथ घेऊन प्रतिज्ञाबद्ध होण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.